twitter button

Gyanbaa-Tukaram



0 comments
न्यूजपेपर मधून अथवा टीव्ही channels मधून आपला देश प्रगती करतोय हे कळतं. आपली ८ तक्क्यानी growth होतेय, हे समझ्ता. आपल्या देशाची जनरल परिस्थिती पाहता, एकदम आश्चर्य वाटत. या सगळ्या chaos मध्ये आपण economic growth achieve करतोय, ही एक मोठी गोष्ट आहे, especially या दिवसांमध्ये. आपण असे काय करतोय की ही feat आपण manage केली??

असच एक दिवस मला फरीद ज़कारिया, यांचे भाषण ऐकायला मिळाले. ते 'प्रथम' नामक NGOच्या  गाला इव्हेंट मध्ये की-नोट स्पीकर होते व प्रेक्षकाना contribution देण्याचे अवाहान करत होते. तर त्यांच्या भाषणात, एका pointवर त्यांनी China-India comparison केली आहे.ते म्हणतात, India is succeeding despite its government whereas China is succeeding because of its government. ते म्हणतात की कितीही problems (economic or otherwise) असले तरी त्यांना human response असतोच. Problems macro levelचे असले तरी response हा micro levelवर  असतो आणि तो micro response हळू-हळू देशात बदल आणतो. खरच आहे, त्या शिवाय का आपली ग्रोथ झाली असती!

पण आता प्रश्न असा की त्याला उत्तर नाही.
लोकांनी मतदान करायचं.
लोकांनी सहनशीलता दर्शावाय्ची.
लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला मदतीचा हात द्यायचा.
पण मग सरकारने काय करायचा?
HR च्या भाषेत म्हटले, तर आपल्या सरकारचे KRAs काय आहेत?

लहानपणी आमच्या society च्या मैदानात संत ज्ञानेश्वर उत्सव साजरा होयचा. वारकरी ठेक्यात नाचायचे. ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम. जसे लोक वाढत जायचे, तसा आवाज मोठा होत जायचा....पण वारकर्यांचा घोळका जागच्या जागीच नाचत असायचा....ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.....त्यांचा घोळका कधी पुढे हललाच नाही, अथवा कधी हलला, तरी अगदी हळू-हळू.

ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.....

तशी काहीशी आपली परिस्थिती झाली आहे का?
नेत्यांचा आवाज मोठा, आकडाही मोठा......पण जागच्याजागी चालूच आहे ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम!!
मुंबई ला शंघाई बनवणार
चोवीस तास पाणी आणि वीज मिळणार
मोठे रास्ते, better law and order.
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.........

बेधड़क आणि illegal  constructions पाडणार.
वाढत्या महागयिला रोखणार
Bureaucracy आणि corruptionला लगाम लावणार.
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.....

आणि या सर्व गदारोळात जातीय वाद आहेतच.
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम......

काहीच होत नाही असं वाटत. नैराश्य येतं. हो! देशाच्या बाहर राहून, आपली दुर्गति होत आहे आणि ती कशी होत आहे, हे चांगलच नीट दिसतं. जेव्हा इतर देशाचे नागरिक आपल्याला प्रश्न विचारतात की तुमच्या देशात सरकार basic सोयी देत नाही का? तेव्हा बोचतं, लाज वाटते आणि या सर्व politiciansना एक खाडकन भड्कावून द्यावीशी वाटते.
पण मग ज़करियांच आपल्या देशाबद्दलचे वाक्य आठवत. खरं आहे ते. India is succeeding despite its government . पण आता आपण कुठच्या बाजुनी पाहिचा ह्याच्याकड़े?

की वाह! Politiciansना न जुमानता लोकं प्रगति पथावर जात आहेत!!!
की  आपला सरकार ineffective आहे अस आपणच आपलं समजून घेऊन  दुसरीकडे migrate होयचा?
का  आपण डोळे बंद करून आणि माना खाली घालून गप गुमान आपली कामं करत रहायची आणि नेत्यांचा ठेका चालू द्यायचा?
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.........
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.........

PS.
Please do hear Fareed Zakaria speak. Its a 25 mins speech.
http://ishare.rediff.com/video/news-politics/india-is-succeeding-despite-its-government-fareed-zakaria/930384

0 comments:

Post a Comment

newer post older post

Recent Comments

Search This Blog